Wednesday, December 14, 2011

’दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है...’


         
मिर्झा गालिब यांची ही गझल म्हणजे म्हणजे दर्दी रसिकांच्या काळजातील जीवघेणी कळ आहे,असे मला वाटते.प्रत्येक माणसाच्या मनातदिल--नादाँ तुझे हुआ क्या है...’ ही भावना कधी ना कधी उद्भवतेच.अशा वेळीआखिर इस दर्द की दवा क्या है...’ हा ही प्रश्न उभा राहतोच.उदासलेल्या मनाला ही गझल त्यामुळेच अतिशय जवळची वाटते.या गझलच्या लोकप्रियतेच्या बाबतीत विचार केला तर,हिच्या इतकी लोकप्रियता दुसर्‌या कोणत्या गझलच्या वाट्याला आली असेल असे मला वाटत नाही.चित्रपटांमध्येही या गझलचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते.१९४३ मध्येहंटरवालीकी बेटी’,१९४९ मध्येअपना देश’,१९५४ मध्ये मिर्झा गालिब’,आणि पाकिस्थानातीलमिर्झा गालिब’या चित्रपटांमध्ये ही गझल चित्रपट गीतांच्या स्वरुपात अनुक्रमेपुष्पा हंस’,’तलत-सुरैय्या’आणि मल्लिका--तरन्नुम नुरजहान यांनी ही गझल गायिली आहे.या व्यतिरिक्त शाहिदा परविन,सुमन कल्याणपुर,परवेज़ मेहदी,जगजित-चित्रा,शुमोना राय बिस्वास,पिनाज मसानी आबेदा परविन आणि मेहदी हसन यांनी या गझलला आपापल्या परीने गायकीचा रंग देवून सजविली आहे.या मध्ये शुमोना राय बिस्वास आणि मेहदी हसन यांनी गायिलेली गझल मला विशेष करून आवडली.शुमोनाची गझल गायकी इतकी सुंदर असतांनाही तिचे नाव रसिकांना पाहिजे त्या प्रमाणात माहित नाही याचे नवल वाटते.तिचा ’dagha-sung by Shumona Roy Biswas' हा अल्बम म्हणजे रसिकांना खरोखरच मेजवानी आहे.ही गायिका इतकी सुंदर गाते की ऐकत राहावे असे वाटते.
           
खालील VDO मध्ये शुमोना राय बिस्वास , मेहदी हसन, सुमन कल्याणपुर,शाहिदा परविन,जगजित-चित्रा सिंग, पिनाज़ मसानी यांनी गायिलेल्या संपुर्ण गझल आहे.शुमोनाची बंदिश पटदीप रागावर आधारित असल्यासारखी वाटते,पण लगेच त्यात इतरही रागांचा उपयोग केल्यामुळे एका रागाचे नाव सांगता येणार नाही.मेहदी हसन यांची बंदिशशुद्ध सारंग’ या रागात बांधलेली आहे.हा माझा आवडता राग आहे.सारंगाच्या इतर प्रकारापेक्षा हा वेगळाच आहे.याला शुद्ध सारंग का म्हणतात हे ही एक कोडेच आहे.कारण कोणत्याच सारंग प्रकारात लागणारातीव्र मध्यम’ या मध्ये लागतो.या रागाचा गानसमय शास्त्रीय व्याख्येनुसार दुपारचा आहे.पं.जसराजजींनी गायिलेला शुद्ध सारंग मनभावन असून,छोटा ख्याल तर लाजवाबच.संगीतकार .पी.नैय्यर यांनी आशा भोसलेच्या आवाजातीलछोटासा बालमा...’या गाण्यात केलेला या रागाचा वापर अवर्णनीय आहे.तसा उपयोग चित्रपट संगीतात अभावानेच आढळतो.या नंतर तसे स्वरशिल्प मेहदी हसन यांनीच उभे केले आहे.त्यातील दोन्ही मध्यमांचा उपयोग तर’क्या बात है....!’(याच रागातील हरिहरन यांनी गायिलेलीज़ब्ते ग़म का सिला दे जाना...’ही गझल रसिकांनी जरूर ऐकावी.म्हणजे शुद्ध सारंगशी आपली मैत्री पटकन होते इतरांच्या गझलांविषयी पुन्हा कधीतरी.)चला तर ऐकू या...दिल--नादाँ......
दिल--नादाँ तुझे हुआ क्या है
आखिर इस दर्द की दवा क्या है

हम है मुश्ताक और वो बेज़ार
या इलाही ये माजरा क्या है

मैं भी मुह मे ज़ुबान रखता हूँ
काश पुछो की मुद्दा क्या है

जबकी तुझ बिन नहीं कोई मौजूद
फिर ये हंगामा अय खुदा क्या है

ये परी चेहरा लोग कैसे है
गमज़ा--इश-- अदा क्या है

सब्ज़ा--गुल कहाँ से आये है
अब्र क्या चीज़ है,हवा क्या है

हमको उनसे वफ़ा की है उम्मीद
जो नही जानते वफ़ा क्या है

जान तुमपर निसार करता हूँ
मैं नही जानता वफ़ा क्या है

मैने माना की कुछ नहीं ग़ालिब
मुफ़्त हात आये तो बुरा क्या है

ग़ालिब

टीप-खालील पोष्ट मध्ये अनुक्रमे शुमोना राय बिस्वास, मेहदी हसन,सुमन कल्याणपुर,शाहिदा परविन,जगजित-चित्रा सिंग, पिनाज़ मसानी यांचे VDO आहेत.

No comments: